आयुष्य
आयुष्य दोघांचं असत
ते दोघांनी सावरायचं
एकानं बिथरवल
तर दुसऱ्याने आवरायचं...
शब्दान लांबल की
विचारानं सोडवायच
हाकेन दातल की
आवाजान थांबायचं...
अश्रु ने भिजल की
पदरान पुसायच
एकानं रागवल की
दुसऱ्याने रुसायच...
एक मुठ दोघात
वाटून खायचं
घुटभर जागेत
एक घरटे बांधायचं...
जिवापाड एकमेकावर
प्रेम मात्र करायचं
एवल्याशा गोष्टीत
मोठं समाधान मानायच...
जन्मापासून सरणापर्यंत
अंतर गाठायच
एक दिवस या जगातून
आठवणीने विलीन व्हायचं...
रडत आलो असलो तरी
हसत मात्र जायचं
पुढच्या जन्मी नाही का
पुन्हा भेटायचं...
आयुष्य दोघांचं असत
ते दोघांनी सावरायचं
एकानं बिथरवल
तर दुसऱ्याने आवरायचं...
🦃💞प्रेम पाखरू....
✍️ अभिजीत भाटळे
Bhava kharach lihayala survat kar ...
ReplyDelete